बंगलुरू – कर्नाटकात बाहेरील राज्यांचे जे मजूर किंवा कामगार रोजंदारीसाठी येथे आले आहेत, त्यांनी काम सोडून गावाकडे परत जाऊ नये, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केले आहे. तुम्ही जिथे आहात तेथेच तुम्हाला काम देण्याची ग्वाही मी देत आहे आणि त्यामुळे तुम्ही कर्नाटक सोडून अन्यत्र कोठेही जाऊ नका तुमच्या हिताची सारी जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे आवाहनही त्यांनी केले.
अफवांवर विश्वास ठेऊन आपल्या गावी परतण्याची घाई तुम्ही करू नका असे आवाहनही त्यांनी केले. स्थलांतरित मजुरांना आपल्या राज्यात परत जाऊ नये म्हणून येडियुरप्पा यांनी केलेले हे दुसरे आवाहन आहे. या आधीही त्यांनी एकदा असेच आवाहन केले होते. आम्ही लवकरच राज्यातील अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.