वासुदेवपूर – यास चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांना बसला आहे. चक्रीवादळाच्या भक्षस्थानी सापडलेल्या परिसराची मोठी हानी झाली असून येथील नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशातच आज ओडिशातील वासुदेवपूर येथील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे.
चक्रीवादळामुळे येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून पिण्याचे पाणी, अन्न, वीज यासर्वांचा पुरवठा खंडित झाला आहे.
याबाबत येथील रहिवाशी दिलीप मैती यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना, “आता आमच्याकडे काहीही उरलं नाही. जे काही होत ते चक्रीवादळासोबत आलेल्या पावसामध्ये वाहून गेलंय. गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला खाण्यासाठी अन्नदेखील मिळालं नाही.” अशा शब्दांत आपली कैफियत मांडली आहे.
येथील नागरिक सध्या सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असून नैसर्गिक संकटाने हिरावून घेतलेला निवारा सरकारी मदतीतून पुन्हा उभारता यावा अशा अपेक्षेत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या यास चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांचा हवाई दौरा करणार असून ते ओडिशामध्ये आढावा बैठक देखील घेणार आहेत.
We have nothing left with us. Everything got drenched in the rain. We have not been able to have food for two days now. I request the Govt to rebuild my house & give us something to eat: Dilip Maiti, a resident of Basudebpur pic.twitter.com/1baW3l9icK
— ANI (@ANI) May 27, 2021