वडगाव मावळ – महिलांनी शरीराच्या तंदुरुस्तीबरोबर मनाची तंदुरुस्ती ठेवल्यावरच आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. राजमाता जिजाऊंच्या विचारातूनच आदर्श पिढी घडू शकते. महिलांनी मातृ सन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या संस्थापक सारिका भेगडे यांनी केले. माऊलीनगर (कामशेत) येथील श्रीराम मंदिरात रविवारी (दि. 15) दोन लाख रुपयांचा मातृ सन्मान योजनेचे फॉर्म भरण्याच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष नंदा सातकर, भाजप युवती तालुकाध्यक्ष राणी म्हाळसकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुमित्रा जाधव, संजना सातकर, आरती भाळवणे, कांचन शिंदे, सरिता सातकर, वंदना भेगडे, भाजप युवती तालुका उपाध्यक्ष ज्योती काटकर व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. या वेळी माऊलीनगर परिसरातील 150 महिलांचे दोन लाख रुपयांचा मातृ सन्मान योजनेचे फॉर्म भरण्यात आले. तसेच अन्य महिलांना संसारोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन अंकुश काटकर यांनी केले. आशा कोंढरे यांनी आभार मानले.