पेठ, (वार्ताहर) – पेठ, ता. आंबेगाव येथून ३५ महिला भाविक श्रीराम प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे रवाना झाले. यावेळी जय श्रीराम या घोषणांनी पेठ गावातील परिसर दणाणून गेला. आंबेगाव तालुक्यातून या महिलांबरोबर ३०९ हून अधिक भाविक असून अयोध्येला नेण्याची निवास, जेवण, नाश्ता व्यवस्था विनामूल्य व्यवस्था जनता पक्षाने केली आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे संजय थोरात यांनी सांगितले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, निवडणूक प्रभारी जयश्री पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदारसंघातून गरीब कुटुंबातील १५०० हून अधिक भाविक पहिल्या टप्प्यात अयोध्येला नेण्याची नियोजन असून निवास, जेवण, नाश्ता व्यवस्था विनामूल्य केली आहे. पेठमधून या महिलांबरोबर ग्रामपंचायत सदस्य अर्चना बुट्टे, उर्मिला कांबळे, स्वाती काळे, रूपाली काळे, स्नेहल चासकर या महिलांबरोबर आहेत.