मोशी – देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारे बदलले आहे. भाजप सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्यांची दैना करून ठेवल्यामुळे जनता नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहे. असे प्रतिपादन खासदार तथा महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. कैलास कदम, चंद्रकांत लोंढे, गौतम अरताडे बाबू नायर, जॉर्ज मॅथु, सोमनाथ शेळके, भरत वाल्हेकर, अण्णा कसबे, अक्षय उदगीरे, धनंजय आल्हाट, वहाब शेख, विठ्ठल शिंदे, नरेंद्र बनसोडे, सुप्रिया पोहरे, मनीषा गरुड, अनिता अधिकारी, उषा साळवी यांसह अनेक महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचे प्रतीक म्हणून बघत आहे. एकदा दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की, काँग्रेस ही अजगरासारखी प्रचंड अवाढव्य आहे, पण ती सुस्त आहे असे वाटत राहते.
तसे अजगराकडे पाहिले की वाटते अजगर सुस्त आहे, पण तोच अजगर भुकेलेला असतो आणि त्याला भक्ष्य दिसते तेव्हा अजगराएवढी ताकद इतर कोणत्याही प्राण्यात नसते. अगदी तसे काँग्रेस असल्याचे आहे असे यावेळी डॉ. कोल्हे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.