कोरेगाव भीमा, – गेली 20 वर्षे मी तुमच्यासोबत राहणारा माणूस आहे. जनतेची काम करण्याची आणि जनतेमध्ये राहण्याची मला आवड असल्यानेच मी राजकारणात असल्याचे यावेळी आढळराव पाटलांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा शिक्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, धानोरे, डिंग्रजवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा असा गावभेट दौरा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी नेते दादा पाटील फराटे, पीडीसीसीचे संचालक प्रदीप कंद, संदीप भोंडवे, स्वप्नील ढमढेरे, भाजपा नेते राहुल पाचर्णे, जयश्री पलांडे, माजी जि. प. सदस्य कुसुम मांढरे, माजी सभापती मोनिका हरगुडे, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख रवी काळे,
भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, आरती भुजबळ, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, जयेश शिंदे, कोरेगावचे सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच विठ्ठलआप्पा ढेरंगे, डिंग्रजवाडीचे राहुल गव्हाणे, आपटीचे अतुल मुरकुटे, वढू बुद्रुकचे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भंडारे यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढळराव येताच बैलगाडा घाटात जल्लोष
बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी शिवाजी आढळराव पाटलांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. याचमुळे आढळराव पाटील आणि बैलगाडा घाट हे नाते अतूट आहे. गाव भेट दौरा सुरु असताना सणसवाडी येथे ग्रामदेवतांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत असल्याचे समजताच आढळराव पाटलांनी घाटाकडे धाव घेतली आणि आढळराव बैलगाडा घाटात येताच बैलगाडा मालक आणि शौकिनांनी त्यांना पाहताच एकच जल्लोष केला.
कॉल केल्यांनतर एका रिंगमध्ये काम करणारा नेता म्हणून आढळराव दादांची ओळख आहे. करोना काळात दादांना सांगितलेली कामे त्वरित केली. मागील 15 वर्षांत दादांनी सणसवाडीसाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. त्याचीच जाणीव असल्याने सणसवाडीकर आढळराव यांच्यासोबत आहेत. -मोनिका नवनाथ हरगुडे, माजी सभापती पंचायत समिती शिरूर