त्रिनिदाद :- कसोटी व एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज बनला आहे. यजमान वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरीही या मालिकेतही भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहलीसह अन्य काही वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून संघातील नवोदितांना आपली छाप पाडण्याची नामी संधी मिळाली आहे.
नाणेफेकीचा (Toss) कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे.वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासाठी या सामन्यात दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दोघेही पहिला टी-२० सामना खेळणार आहेत.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे :-
भारत :- शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज :- काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (सी), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
दरम्यान,यापूर्वी टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता.