बार्बाडोस :- नवा कर्णधार, नवोदित खेळाडू तसेच नवे वातावरण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम यजमान वेस्ट इंडिज संघाला अपेक्षित असला तरीही प्रत्यक्ष सामन्यात काय होणार हे त्यांचा खेळ कसा होतो यावरच अवलंबून राहणार आहे.
आज त्यांचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना होणार असून कसोटीतील फॉर्म कायम राखत या सामन्याद्वारे तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यास केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे थोड्याच वेळात(७.०० वाजता) सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
वेस्ट इंडिज :- शाई होप (wk/c), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाज, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी.
भारत :- रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (wk), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
दरम्यान, कसोटीप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे वेस्ट इंडिजवर प्रदीर्घ काळापासून वर्चस्व राहिले आहे. विंडीजने शेवटची वनडे मालिका 2006 मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध सलग 12 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. आता भारताचे लक्ष्य सलग 13वी वनडे मालिका जिंकण्याचे असेल.