बेल्हे: जुन्नर तालुक्यात बुधवार (दि.३) रोजी दुपारी आलेल्या चक्रीवादळाने तालुक्याच जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी दुपारी चार ते पाच दरम्यान पश्चिम दिशेकडून उत्तर दिशेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर असल्याची नोंद खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाच्या (जीएमआरटी) वेदर स्टेशनच्या आलेखावर झाली असल्याची माहिती जीएमआरटीचे वरिष्ठ अधिकारी जे. के. सोळंकी यांनी दिली.
तालुक्यात सुमारे दोनशे विजेचे पोल पाडून वीज वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तालुक्याची बुधवार दुपारपासून वीज गायब आहे. गुरुवारी सायंकाळ उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
या वादळाने पिंपरी पेंढार येथील अरुण बाबुराव शेटे या शेतकऱ्याची १ एकर केळीची बाग भुई सपाट झाली आहे व एक एकर शेतातील बाजरी व आंब्याची १५ झाड सुसाट वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाली. यात ऐकून दीड ते पावणे दोन लाख रुपयांच नुकसान झाल असून अवकाळी संकटाने शेटे हताश झाले आहेत.
बांगरवाडीतील राजेंद्र दिघे या शेतकऱ्याची दीड एकर केळीची बाग व एक एकर ऊस जमीन दोस्त झाली आहे. या वादळामुळे दिघे यांचं दिड ते पावणे दोन लाख रुपयांच नुकसान झालं असून शासनाने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी केली आहे.
गुंजाळवाडी येथील जयराम वाघ व ओंकार वाघ या शेतकऱ्यांचं केळी व डाळिंबाच लाखो रुपयांचा नुकसान झालं आहे. जनावरांच्या शेडची पत्रे उडून गेली असून घराची कौले ही उडाली आहेत. वाघ यांची ३ एकर केळीची बाग उदवस्त झाली असून दोन एकर क्षेत्रातील डाळिंब वाऱ्यामुळे खाली पडली आहेत. वाघ यांचं पाच ते साडेपाच लाख रुपयांच नुकसान झालं आहे.
राजुरीतील रवी औटी या शेतकऱ्यांच्या पावणे तीन एकर शेतातील सगळी केळी जमीदोस्त झाली आहे. यामुळे औटी यांच केळी व इतर पिकाच मिळून सुमारे १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यांमुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठ संकट कोसळलं आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.
नळवणे येथील बाबाजी शिंदे यांच्या २ एकर डाळिंबाची नुकसान झाली आहे. काही दिवसांत तोडायला येणारे डाळिंब वादळाने खाली पडल्याने लाखो रुपयांची नुकसान झाली आहे. डाळींब,मका,सीताफळ अशा पिकाच ही नुकसान झाल आहे. बांगरवाडीतील महेंद्र बांगर यांच्या पॉलिहाऊस चे तसेच आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबे वादळाने खाली पडले आहेत तसेच आंब्याची झाडेही उपटून पडली आहेत.
” दुष्काळ,अतिवृष्टी, कोरोना व आता चक्रीवादळ यामुळे शेतकरी खचून गेला आहे. आंबा,डाळिंब,पालेभाज्या,सीताफळ,केळी, ऊस,जनावरांचा चार अस प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.बळीराजा हवालदिल झाला असून संकटावर संकट येत आहेत.”
दत्ता खोमणे
शेतकरी, बेल्हे
“वाऱ्याच्या या वेगामुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे.
वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे बुधवार (दि.४) सकाळपासून सुरू केले आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल”.
अतुल बेनके
आमदार जुन्नर