दिल्ली : केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल केजरीवाल सरकारवर तोफ डागली आहे. दिल्लीकरांनो दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का? असा सवाल त्यांनी केला. दिल्लीच्या जनतेची केजरीवाल सरकाने फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल सरकाने पाच वर्षात कोणतेच काम केले नाही. फक्त केजरीवाल सरकाने पाच वर्षात फक्त जाहिरातबाजी केली. सरकारचा कार्यकाळ संपत आल्यावर केजरीवाल कमला लागले. केजरीवाल यांनी जनतेला कामाचा आढावा द्यावा असेही ते म्हणाले.
दिल्लीची जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देईल असेही ते म्हणाले. भाजपने विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हरवले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना भाजप धूळ चारेल असेही ते म्हणाले.