नवी दिल्ली : आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चार दिवसांच्या कसोटी प्रस्तावास भारताचा कर्णधार विराट कोहलीने पूर्णपणे विरोध दर्शविला आहे.
India captain Virat Kohli has slammed the proposal of four-day Tests. https://t.co/1QJpDj57SM
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2020
याबदल प्रतिक्रिया देताना विराटने म्हटले की, ” चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटचा मी अजिबातच चाहता नाही. आज चार दिवस म्हणत आहात, उद्या तीन दिवसांवर याल. यामुळे कसोटी क्रिकेट नष्ट होईल. माझा अशा गोष्टीला पाठिंबा नाही.”
पुढे बोलताना कोहली म्हणाला,” यापूर्वी जेव्हा क्रिकेट सुरू झाले,तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पारंपरिक पाच दिवसीय कसोटी क्रिकेटच सर्वोत्कृष्ट होते. माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये ‘दिवस-रात्र’ कसोटी इतकाच बदल खूप आहे. यामध्ये आणखी बदल नकोच.”
दरम्यान, याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रस्तावास भक्कम पाठिंबा दिला आहे. तर अस्ट्रोलियाचा खेळाडू नॅथन लियोन आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी देखील विरोध दर्शविला आहे.