मुंबई: येत्या ५ ऑगस्ट’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे कमी लोकांच्या संख्येत हा कार्यक्रम होणार आहे. अयोध्या आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यावर अयोध्येला गेले होते.
५ ऑगस्ट’ला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, अयोध्येत राममंदिराच्या भूमीपूजनाला जाण्यासाठी शिवसेनाला निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. या रस्त्यातील अडथळेही शिवसेनेने दूर केले आहेत. उद्धव ठाकरे अयोध्येला पूर्वीपासूनच जातात. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे
संजय राऊत म्हणाले, अयोध्या आणि राम जन्मभूमीवर आमची श्रद्धा आहे. हिंदुत्त्व या भावनेतूनच शिवसैनिकांनी बलिदान केल. राममंदिराचा विषय राम जन्मभूमी न्यास यांच्या ताब्यात असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. अजून किती लोकांना बोलवणार आहेत किंवा राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळणार आहेत हे लवकर कळेल.