नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती (का) कायद्यावरून विरोधकांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्यात सर्व समाज, जाती पाती, धर्माच्या बांधवांना भगिनींना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार हे कोणत्याही समाज, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही.
"सर्व समाज, जाती पाती, धर्माच्या बांधवांना भगिनींना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार हे कोणत्याही समाज, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही. आपले हक्क या राज्यात अबाधित राहतील."
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/6BWlLWMMI7— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 20, 2019
आपले हक्क या राज्यात अबाधित राहतील.” असे ट्विट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तत्पूर्वी बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही बिहारमध्ये अल्पसंख्यांक सुरक्षित असल्याचे म्हंटले आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) काय गरज असा प्रश्न त्यांनी उस्थित केला . दरम्यान देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून हिंसक निर्दशने होत आहे.