खडकवासला – पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे धरण साखळीमध्ये शंभर टक्के पाऊस होऊन देखील ही पाणी कपात पुणेकरांवरती लादण्यात आलेली आहे एका बाजूला बांधकामांना पाणी वापरासाठी कुठलेही निर्बंध नाहीत उद्योगांसाठी निर्बंध नाहीत परंतु घरगुती वापरासाठीच पाणी कपात का हाच मुळात नागरिकांना पडलेला प्रश्न आहे जर शंभर टक्के पाऊस होऊन देखील पाणी कपातीच्या संकटाला पुणेकरांना सामोरे जावे लागत असेल,
तर भविष्यामध्ये एखाद्या वर्षी जर पाऊस कमी पडला तर पुणेकरांचे किती हाल होतील ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे व पाण्याचे संकट भविष्यामध्ये किती गंभीर स्वरूपाचे होऊ शकते हेच पुणेकरांनी आता लक्षात घेतले पाहिजे पाणी कपाती वरती तीव्र स्वरूपाची नागरिकांमध्ये नाराजी असून हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा व लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
समाविष्ट गावांमध्ये जी काय छोटी घरे आहे त्यांच्याकडे पाणी साठवण करण्याकरिता टाकी सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दोन दोन मैलांवर पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून पाणी कपातीचा निर्णय त्वरित मागे घेतला जाईल हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
– विजय मते, अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ मनसे