मुंबई – आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे कमळाचे चिखल गेले कुठे? प्रत्येकवेळेला दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होते आणि आता का नॉट रिचेबल झाले?, असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या असे कॅरेक्टर महाराष्ट्रात तयार झालंय की फक्त भोंगा घेऊन बोंबलणार, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
दरम्यान, ज्या भोंग्याने लोकांना झोपू दिलं नाही ते भाजपात गेले आणि आता शांत झोपले. याचाच अर्थ किरीट सोमय्या भोंगा घेऊन बोलणार मग सगळे जाऊन भाजपमध्ये विलीन होणार आणि सगळे बसणार व दुसऱ्यांच्या मागे लागणार. माझा एकच प्रश्न आहे, कमळातलं चिखल गेलं कुठे?, असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला आहे.