काऱ्हाटी -सध्या जगभर करोनाने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांचे काम अर्धवट राहिले आहे. नागरिकांनी लॉकडाऊन पूर्वी मोठ्या कष्टाने आपल्या घराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यांच्या घराचे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे.आता ते कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही, त्यामुळे स्वप्नातील घराला घरघर लागली आहे. काहींनी राहत्या जागेवरच नवीन घर बांधणी सुरू केली.
अशांना आता उघड्यावर राहावे लागत आहे. परिणामी घरमालकांची कोंडी झाली आहे. संसाराला उघड्यावर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी आपल्या घराचे बांधकाम डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू केले होते.
त्यांना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायचे होते मात्र सुरक्षितता व स्वच्छता खबरदारी घेण्यासाठी शासनाने बांधकामाला ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली घराचे बांधकाम सध्या अर्धवट राहिले आहे.