Varun Gandhi Letter| भाजपकडून लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत काही नेत्यांचा पत्ता कट केला आहे. वरूण यांच्या पिलीभीत मतदार संघातून भाजपकडून जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर आता वरूण गांधी यांनी गुरुवारी पीलीभीतमधील जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले की, ‘कितीही किंमत मोजावी लागली तरी तुमची सेवा करत राहीन,’ असे म्हंटले आहे.
वरुण गांधी यांचे पत्र Varun Gandhi Letter|
वरुण गांधींनी पत्रात लिहिले की, ‘आज जेव्हा मी हे पत्र लिहित आहे, तेव्हा असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. मला आठवतंय तो 3 वर्षाचा मुलगा जो 1983 मध्ये पहिल्यांदा आईचं बोट धरून पिलीभीतला आला होता, त्याला कसं माहीत होतं की एक दिवस हीच जमीन त्याचं कामाचं ठिकाण होईल आणि इथले लोकच त्याचं कुटुंब बनतील. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला पीलीभीतच्या महान लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. पिलीभीतमधून मला मिळालेले आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणा यांचा माझ्या संगोपनात आणि विकासात, केवळ एक खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही मोठा वाटा आहे.’
वरुण गांधी यांनी पिलीभीतचे खासदार असणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे. पुढे त्यांनी लिहिले की, “तुमचा प्रतिनिधी असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि तुमच्या हितासाठी मी नेहमीच माझ्या क्षमतेनुसार आवाज उठवला आहे. माझा खासदारकीचा कार्यकाळ संपत असला तरी पिलीभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही. ”
प्रणाम पीलीभीत 🙏 pic.twitter.com/D6T3uDUU6o
— Varun Gandhi (@varungandhi80) March 28, 2024
“खासदार म्हणून नाही तर मुलगा म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि पूर्वीप्रमाणेच माझे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी राजकारणात आलो आणि आज कितीही किंमत मोजावी लागली तरी हे कार्य सदैव करत राहण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या.” Varun Gandhi Letter|
यावेळी पिलीभीतमधून तिकीट न मिळाल्यावर वरुण गांधी यांनी जनतेला सांगितले की, “माझे आणि पीलीभीतमधील नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे, जे कोणत्याही राजकीय गुणवत्तेपेक्षा खूप वरचे आहे. मी तुमचा होतो, आहे आणि राहणार.”
दरम्यान, पिलीभीतमध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ही प्रक्रिया संपल्यानंतर वरुण गांधी अपक्ष म्हणूनही पिलीभीतमधून निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
हेही वाचा: