Bacchu Kadu । भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. यावरून आता महाराष्ट्र एनडीएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी महायुतीत राणा यांना प्रचंड विरोध झाला आहे.
प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील यापूर्वी आपण उमेदवार देणार असल्याची तयार दाखवत राणा यांना विरोध दर्शवला होता. तर या विरोधाला नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी यांनीसुद्धा प्रतिउत्तर देत कडूंवर टीका केली होती. अशात आता भाजप पक्षाने नवनीत राणा यांना तिकट दिल्यानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांना विनंती केली आहे. तर बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना कडू प्रतिक्रिया दिली आहे.
Bacchu Kadu । नेमकं काय म्हणाले बच्चू कडू
‘अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपाने लोकसभेचे तिकीट जाहीर केलं ही भाजप पक्षाची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजयी होणे असे नाही. उमेदवारी देऊन विजयी होता येते का? तसे झाले नाही तर चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना पाडता येते का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो, अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे’ असेही बच्चू कडू म्हणाले आहे.
हे वाचले का ? ‘पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा म्हणाले,’हात जोडून विनंती बच्चू कडूंनी सपोर्ट…’