मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होत आहेत. सत्तांतर हा विषय कोणत्याच राज्यासाठी नवीन नाही मात्र पक्ष फुटून झालेलं सत्तांतर राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची नावे समोर येतात. अशात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने या सर्व राजकारणाविरोधात ‘एक सही संतापाची’ ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर हजेरी लावली होती. यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाबाबत भाष्य केले.
हे तुम्हाला दिसतंय हे प्रातिनिधिक आहे. तुम्ही घराघराचा कौल घेतला तर प्रत्येक घरात संताप आहे. असं यावेळी मोहिमेदरम्यान बोलताना राज ठाकरे म्हणाले. ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालं ते संतापजनक आहे घाणेरडं आहे. याआधी असं कधी घडलं नव्हता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे. असं स्पष्ट मत यावेळी ठाकरेंनी व्यक्त केलं.
उद्यापासून राज्यात अधिवेशन सुरु होत आहे. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल ? असा सवाल पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारला. यावर ‘घंटा’ अशी एका शब्दात प्रतिक्रिया देत राज ठाकरे तेथून निघून गेले.
काय म्हणाले ठाकरे नेमकं यावेळी ?
सध्या ज्या तडजोडी सुरु आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटत नाही.
भांडतात एकत्र येतात. जे डॅमेज व्हायचय ते झालय.
सत्ता आणि स्वार्थाच हे राजकारण घाणेरडं आहे.
राजकारणात भविष्यात येणाऱ्या पिढयांच्या ताटात आपण काय वाढतोय ? हे कसलं राजकारण आहे.