मुंबई – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला होता. यासाठी पवार यांनी ४८ तासाचा अल्टिमेटम देखील दिला होता. यावरून आता भाजप नेत्याने ट्विट करत पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??” असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. असं ट्विट देखील राणे यांनी केलं आहे. सीमा प्रश्न उफाळून आल्यानंतर दोन्हही राज्यांमध्ये याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. राज्यातील विरोधकांनी देखील या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले होते.
ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 9, 2022
काय म्हणाले होते शरद पवार नेमकं
“हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल, अस शरद पवार म्हणालेहोते. वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा देखील शरद पवार यांनी यावेळी दिला होता.