नवी दिल्ली – मागासवर्गीयांच्या विकासासाठी किंवा त्यांना बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींना नेमके काय केले असा सवाल राष्टीय जनतादलाचे राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी केला आहे.
झा यांनी एएनआयला सांगितले की, देशातील मागासवर्गीयांना मजबूत करण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष अयशस्वी ठरला आहे.मोदींच्या सरकारने मागासवर्गीयांसाठी केलेले काम हाच त्यांच्या सरकारच्या मूल्यमापनाचा आधार असेल.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, आम्ही तरुण होतो तेव्हा भाजप (तेव्हाचा जनसंघ) कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल कोणत्या प्रकारच्या कमेंट करत असे याची आम्हाला कल्पना आहे. आणि त्यांचे सरकार पाडण्यात त्यांनी कोणती भूमिका बजावली होती त्याची सर्व ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत असेही त्यांनी नमूद केले.
सध्या ओबीसी समाजाच्या विषयावरून कॉंग्रेस व भाजप यांच्यात जोरदार वादंग सुरू आहे त्या पाश्र्वभूमीवर झा यांनी मोदींना हा सवाल केला आहे.