वाल्हे : टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषात आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सजविलेल्या एसटीतून आळंदीतून पंढरपुरकडे दुपारी मार्गस्थ झाल्या. एसटीचे वाल्मिकनगरीमध्ये आगमन होताच ग्रामस्थांसोबतच वरुणराजाने हजेरी लावली.
रिमझिम पावसाच्या आगमनाबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत महामार्गाच्या कडेला उभे राहुन वाल्हेकरांनी फुलांच्या पायघड्या अंथरुन पुष्पवृष्टी करत विठूनामाचा जयघोषात मोठ्या जल्लोषात माऊलींच्या पादुकांचे स्वागत करत भावपुर्ण निरोप दिला.
यावेळी महामार्गाच्या दुतर्फा सोशल डिस्टन्सिंग पाळत वाल्हेकरांनी रस्त्यावर अंथरलेल्या फुलांच्या पायघड्या बरोबरच पुष्पवृष्टी व विठूनामाचा जयघोष करत पालखीला भावपुर्ण निरोपही दिला.
यावेळी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, विक्रम भोसले, सुनिल पवार, प्रा. संतोष नवले, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, गोरख कदम, हनुमंत पवार, आदी उपस्थित होते. यावेळी जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, समीर हिरगुडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.