नवी दिल्ली :– कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केरळमधील वायनाड सर्व आदिवासींच्या मूलभूत कागदपत्रांचे डिजिटायझेशन करणारा भारतातील पहिला जिल्हा बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. वायनाड लोकसभा मतदार संघातूनच राहुल गांधी लोकसभेवर निवडून आले आहेत.
राहुल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “सशक्त आदिवासी समुदाय हा सशक्त भारताचा पाया आहे. सर्व आदिवासींसाठी मूलभूत दस्तऐवज उपलब्ध करून देणारा आणि डिजिटायझेशन करणारा वायनाड हा भारतातील पहिला जिल्हा असल्याचा अभिमान आहे,”असे त्यांनी म्हटले आहे.
Proud that Wayanad is India’s 1st district to provide & digitise basic documents for all Tribals.
Applaud the collective efforts of District admin, local bodies & people’s representatives for this initiative.
An empowered tribal community is the cornerstone of a strong India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2023
या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.