वाल्हे -करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच गावाजवळील 12 वाड्या -वस्त्या रविवार (दि. 12) ते मंगळवार (दि. 14) पर्यंत तीन दिवस 100 टक्के बंद करण्या आले आहे.
याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू केल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले. ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सचिन लंबाते, दत्तात्रय पवार, उषा पवार, तलाठी नीलेश पाटील, पोलीस हवालदार हनुमंत गार्डी, धनंजय पवार, सागर भुजबळ, अमोल भुजबळ, सचिन जाधव उपस्थित होते.
बंदच्या काळात गावातील सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल वगळून सर्व दुकाने 100 टक्के दुकाने बंद असणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या व सामाजिक आरोग्यास बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी व जमावबंदी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी सांगितले.