जुन्नर तालुक्यात कष्टकऱ्यांना भाकर द्या : नागरिकांची मागणी
बेल्हे -प्रजासत्ताक दिनापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 11 ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेला पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गोरगरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली शिवथाळी ग्रामीण भागातही सुरू करून गरजूंना लाभ देण्यात यावा, अशी मागणी ग्रामीण भागातून
होत आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तसेच तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ही योजना सुरू करावी. बचत गट, खानावळी, भोजनालय येथे ही योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचे राज्यभर स्वागत होत आहे. या थाळीला राज्यात प्रतिसाद मिळत आहे. परंतु ही योजना ग्रामीण भागातील रुग्णालय, मजूर अड्डे, मालधक्का, गावातील किंवा तालुक्याच्या ठिकाणचा महत्त्वाचा चौक, एसटी स्टॅंड, महाविद्यालय परिसरातही सुरू करून गरिबांना दिलासा देण्याची गरज आहे.
गरिबांना ही थाळी म्हणजे पर्वणीच ठरत आहे. परंतु दुपारी 12 ते 2 या वेळेत हे भोजन मिळत असल्यामुळे काही वेळातच संबंधित केंद्रावरील जेवण संपून जाते. त्यामुळे सरकारने शिवभोजन थाळीची संख्या, वेळ आणि भोजन थाळीचे केंद्रही वाढवावेत.
विशेषत: जिल्हा रुग्णालय, एसटी स्टॅंड, महाविद्यालय, तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण, चौक आदी परिसरांमध्ये केंद्र सुरू करावेत, अशी मागणी पोपट बढे, सुरेश काकडे, मनोहर पटाडे, शाम बढे यांनी केली आहे.