खळद- येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी गाव प्लॅस्टिकमुक्त करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी परिसरामध्ये फेरी काढून महाश्रमदान केले. प्लॅस्टिकचा कचरा जमा करुन भविष्यात परिसरात स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप, बबन मेमाणे, मधुकर रासकर, ज्ञानेश्वर कामथे, संजय कामथे, जनार्धन इभाड, बाळासाहेब इभाड, भारत कामथे, किशोर कामथे, बाळासाहेब कुंभार, सुरेश कामथे, सिंधुबाई कामथे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.