voting । राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात एकूण 6.45 टक्के मतदान झालं आहे. त्यातही सर्वाधिक मतदान हे नंदुरबार मतदारसंघात झालं. त्या खालोखाल रावेर मतदारसंघात 7.14 टक्के मतदान झाले आहे.
११ मतदार संघातील आकडेवारी voting ।
जळगाव – 6.14 टक्के
जालना – 6.88 टक्के
नंदुरबार – 8.43 टक्के
शिरूर – 4.97 टक्के
अहमदनगर – 5.13 टक्के
छ. संभाजीनगर – 7.52 टक्के
बीड – 6.72 टक्के
मावळ – 5.38 टक्के
पुणे – 6.61 टक्के
रावेर – 7.14 टक्के
शिर्डी – 6.83 टक्के