visakhapatnam fire :आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात असलेल्या मासेमारीच्या बंदरात आज पहाटे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी मासेमारी बंदरात भीषण आग लागल्याने बंदरात उभ्या असलेल्या ४० यांत्रिक मासेमारी नौका जळून खाक झाल्या. रविवारी रात्री उशिरा लागलेली आग सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये बोटी जळताना दिसत आहेत.
आग लागल्यानंतर बंदरावर उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी तातडीने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. मच्छिमारांनी सांगितले की, आग एका बोटीतून लागली, ती काही वेळातच इतर बोटींमध्ये पसरली. आग लागलेल्या बोटीच्या आजूबाजूला इतर बोटी नांगरल्या गेल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे आग वेगाने पसरण्यास मदत झाली. बहुतांश बोटी लाकडाच्या होत्या किंवा त्यामध्ये प्लास्टिक असल्याने आग आणखी पसरली.
At least 25 fishing boats were reduced to ashes in a major fire, #Visakhapatnam #Vizag #fishing harbour #AndhraPradesh. @APPOLICE100 @vizagcitypolice #fire dept takes support of @vptIndia @PRO_Vizag . Only property damage reported so far. #BreakingNews pic.twitter.com/43hDWzBn7d
— Journo Kamal V (B+) (@JournoKamal) November 19, 2023
दरम्यान, एलपीजी सिलिंडर फुटल्याने ही आगीची घटनाघडली असल्याचे म्हटले जात आहे. बोटींवर ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यातच त्याठिकाणच्या ४० बोटी काही वेळातच जाळून खाक झाल्या. मात्र, एलपीजी सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला हे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, पोलिस उपायुक्त के आनंद रेड्डी यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चारहून अधिक अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या आगीमुळे सुमारे 40 मासेमारी नौकांचे नुकसान झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. प्रत्येक बोटीची किंमत किमान 40 लाख रुपये होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आगीचे नेमके कारण शोधून काढू, असे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.