नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा व निर्णायक सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. अर्थात या मालिकेत पहिले दोन सामने जिंकल्यामुळे ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणजेच ‘विराट कोहली’ने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत आपल्या चाहत्यांना चांगलंच खुश केलं आहे.
विराट कोहली म्हणजे भारतीय संघाचे रनमशीन मानले जाते. आक्रमक फलंदाजी, जशी फलंदाजी तसाच आक्रमक स्वभाव, समोरच्या गोलंदाजांवर राज्य करत त्याने अनेक शतके फटकावली. यावेळी विराट कोहलीनं 241 चेंडूत शतक ठोकलं असून आपल्या कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवला असल्याचं दिसून आलं. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.
As 𝙥𝙪𝙧𝙚 as conversations can get! 😃
Player of the Match @imVkohli with #TeamIndia Head Coach Rahul Dravid 👌🏻
Coming 🔜 on https://t.co/Z3MPyeL1t7 ⌛️#INDvAUS pic.twitter.com/sgrBAuFz8T
— BCCI (@BCCI) March 13, 2023
दरम्यान,चौथ्या कसोटी सामन्यात विराट प्लेअर ऑफ द मॅच (सामनावीर) ठरला. या कामगिरीमुळे विराटच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदला गेला आहे. भारतीय संघाची रनमशीन अशी ओळख असणाऱ्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फ्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळविण्याची ही दहावी वेळ आहे. वन-डेमध्ये त्याने 38 वेळा तर टी-20 मध्ये त्याने 15 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरर्मेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक वेळा फ्लेअर आीफ दम मॅच सामनावीर पुरस्कार त्याने पटकावला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.