बेंगळुरू : राॅयल चॅलेंजर बेंगळुरू संघाच्या सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट, व्टिटर व इस्टाग्रामवरील सगळे फोटो, संदर्भ काढून टाकताना मला कल्पना का दिली नाही, अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीने संताप व्यक्त केला आहे. संघमालकांच्या या निर्णयावर तसेच कृतीवर कोहलीसह संघातील खेळाडू, चाहते तसेच क्रिकेट वर्तुळातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
LOGO ka kaam hai kehna. 😄 Thrilled to see our new @rcbtweets logo. It embodies the Bold pride and challenger spirit that our players bring to the field. Can’t wait for #IPL2020 #NewDecadeNewRCB 🤩 https://t.co/n8c24JqbAl
— Virat Kohli (@imVkohli) February 14, 2020
इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) या संघाने गेल्या बारा वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळविलेले नाही. संघात कोहलीसह अनेक स्टार खेळाडू असूनही संघाला कधीही यश मिळालेले नाही. संघ आपल्या नावात बदल करणार असल्याचे गुरूवारूच स्पष्ट झाले होते. राॅयल चॅलेंजर्स असे नवे नाव संघाने ठेवले आहे. हाच बदल इस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला आहे.
कोहलीला देखील या कृतीचा राग आला असून त्यानेही ट्विटरवरच संघ व्यवस्थापनला हा सगळा काय प्रकार आहे अशी विचारणा केली आहे. तसेच हे सर्व करताना कर्णधार या नात्याने मला पूर्वकल्पना तरी द्यायला हवी होती, असेही म्हटले आहे.
Posts disappear and the captain isn’t informed. 😨 @rcbtweets, let me know if you need any help.
— Virat Kohli (@imVkohli) February 13, 2020
हा सगळा काय प्रकार आहे, मला तर काहीच समजत नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा लेगस्पीनर युजवेंद्र चहल यानेदेखील दिली आहे.
सर्वकाही अलबेल
कोहलीने रोष व्यक्त केल्यानंतर राॅयल चॅलेंजर्स संघाने कोहलीची समजूत काढली आहे. सर्व काही अलबेल आहे, काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीची सुरूवात शून्यापासून होते आणि आता आपणही शून्यापासून सुरूवात करत आहोत, असेही संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.