नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही काळापासून पारशी समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. कदाचित त्याला सातत्याने खेळत असल्यामुळे मानसिक थकवा आला असावा, त्याने काही सामन्यांतून विश्रांती घ्यावी, असे मत माजी कसोटीपटू साबा करीम यांनी व्यक्त केले आहे.
सतत खेळल्यामुळे तसेच मोठी खेळी करता येत नसल्याने कोहलीवर वैयक्तिक कामगिरीचे मोठे दडपण असल्याचे स्पष्ट दिसते, त्यासाठीच विश्रांती हाच सर्वोत्तम उपाय आहे, असेही ते म्हणाले.