नवी दिल्ली – 21 व्या शतकातील महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. भले ती शेतकरी असेल. आज आधुनिकतेच्या युगात बिहारमधील महिला आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.काळाची गरज लक्षात घेऊन महिला शेतकरी (Wome farmer) शेतीत नवनवीन प्रयोग करून आपल्या यशोगाथा लिहित आहेत. बिहारमधील अशीच एक महिला शेतकरी (Bihar Farmer) म्हणजे विद्या राणी (Vidya rani) ज्या धान्य, भाजीपाला, मत्स्यपालन, पशुपालन यासह पारंपारिक पिकांच्या लागवडीतून चांगली कमाई करत आहे. याशिवाय त्या इतर महिलांनाही शेतीसाठी मार्गदर्शन करत असतात.
भोजपूर जिल्ह्यातील कोइलवार ब्लॉकमधील खेसरहिया गावात राहणाऱ्या विद्याराणी सिंह सुमारे 11 एकर जमिनीत शेती करतात. पूर्वी त्यांचे पती शेती करायचे, पण नंतर त्यांनी शेती सोडली. मग विद्याराणी यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतः मेहनतीला सुरुवात केली आणि धान्याची लागवड त्यांनी सुरु केली.सुमारे २३ वर्षांपूर्वी शेती करायला लागलेल्या या महिला शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून धान्याची लागवड करत आहेत. त्यांना वर्षाला सर्व खर्च जाऊन सुमारे आठ ते दहा लाखांची कमाई होत आहे. मात्र घराच्या सीमाभिंती ओलांडून शेताचा रस्ता धरण त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.
शेती असतानाही बाजारातून धान्य आणावे लागत होते.
शेतकऱ्याशी संवाद साधताना विद्याराणी सिंह सांगतात की, शेतीत येण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. सासू, सासरे यांच्या निधनानंतर घरातील शेती थांबली होती. पती व्यवसायाने वकील असल्याने त्यांना शेतीत जास्त वेळ देता आला नाही. त्यामुळे भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सर्वच वस्तू बाजारातून विकत आणाव्या लागल्या. तरीही चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध झाले नाही. या सर्व अडचणी पाहून त्यांनी २००० साली शेती करण्यास सुरुवात केली. आज त्या गेल्या दोन वर्षांपासून आपल्या शेतात भात, मका, गहू, बाजरी, ज्वारी, मका, ऊस, मासे, पशुपालन आणि भाजीपाला यासह भरड धान्याची लागवड करत आहे. यातून त्या वर्षाला सहा ते सात लाख कामे करतआहे.
मिळाली नवी ओळख
कोइलवार ब्लॉकच्या खेसरहिया गावातील चंद्र प्रकाश सिंह यांच्या ५६ वर्षीय पत्नी विद्याराणी सिंह या त्यांच्या कामांमुळे ओळखल्या जात आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांना शेतीशी संबंधित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या 23 वर्षांच्या शेतीच्या प्रवासाबाबत त्या सांगतात, की त्या स्वतः ट्रॅक्टरने शेत नांगरतात. त्या शेतीसाठी इतर लोकांवर अवलंबून नाहीत.
आता त्यांची मुलेही त्यांना शेतीत मदत करत आहेत. याशिवाय गावातील इतर महिलाही त्यांच्यापासून प्रभावित होऊन शेतीत रस दाखवू लागल्या आहेत. त्या पुढे सांगतात की, लग्नानंतर त्यांनी केवळ शेतीच केली नाही तर मॅट्रिक, इंटरमिजिएट आणि ग्रॅज्युएशनही पूर्ण केले. आज विद्या राणी गावातील इतर महिलांसाठी एक आदर्श निर्माण करत आहे.