मुंबई – ऑस्ट्रलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला मोठे अपयश आले. त्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) भारताच्या टी-२० संघाची पूर्ण रचनाच बदलण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. कारण या स्पर्धेनंतर संघाच्या निवडीवरून बीसीसीआयवर मोठी टीका करण्यात आलेली होती. त्यानंतर बीसीसीआयने निवड समितीच बरखास्त केली आणि नव्याने नेमणूक करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यामुळे आता या निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमकं कोण बसणार याबाबत अनेक वितर्क लावले जात आहेत.
त्याचवेळी भारतीय संघाच्या टी-२० क्रिकेटमधील नेतृत्वावरून रोहित शर्माही नेटकऱ्यांच्या चांगलाच निशाणावर आल्याचे दिसले. त्याचबरोबर आयपीएलमध्ये गुजरात संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याकडे भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद दिले जावे, अशी मागणी देखील एका वर्गाकडून केली जात होती. या सगळ्या घडामोडीदरम्यान अनेकांनी भारतीय संघ व बीसीसीआयबाबत ( BCCI ) टीका टिप्पण्या केल्या. अनेकांनी वेगवेगळे सल्लेदेखील दिले.
भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या माजी खेळाडूला बीसीसीआय बसवणार हे अजूनही नक्की नाही. मात्र भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या निवड समितीच्या नवीन अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआय एका टी-२० क्रिकेटमधील स्पेशलिस्ट क्रिकेटरच्या शोधात आहे. त्यामुळे सध्या या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये प्रसाद हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे त्याची नोवाद होणे निश्चित मानले जात आहे.
बीसीसीआयची निवड समिती अशी असू शकते
व्यंकटेश प्रसाद यांनी दक्षिण विभागातून प्रतिनिधी म्हणून नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे पश्चिम विभागातून, सलील अंकोलाचे नाव बर्याच वेळा आले आहे. बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांचे पाठबळ मिळाल्यास भारताचा माजी वेगवान गोलंदाजाची निवड होऊ शकते पूर्व विभागातून ओडिशाचे एसएस दास निवडले जाऊ शकतात. उत्तर मधून मनिंदर सिंग, अतुल वासन आणि निखिल चोप्रा हेही स्पर्धेत आहेत नयन मोंगिया हे मध्य विभागातून संभाव्य निवडणुक म्हणून चर्चेत असलेले दुसरे नाव आहे.
प्रसाद यांनी आयपीएलवर ताशेरे ओढले
And change approach drastically. We haven’t won a T20 WC since the IPL started & last 5 years have been poor in ODI’s apart from winning inconsequential bilateral. Haven’t learned from our mistakes for too long and far from being an exciting team in limited overs cricket. CHANGE
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) December 7, 2022
प्रसाद यांनी बीसीआयला सल्ला देताना आयपीएल स्पर्धेबाबत परखड भूमिका घेतल्याचे दिसत आहे. एक ट्विट करून त्यांनी म्हटले आहे की, “आयपीएल सुरू झाल्यापासून आम्ही एकही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही आणि मागील पाच वर्षांत एखादी द्विपक्षीय मालिका जिंकण्याशिवाय मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील फारसे काही केले नाही. त्यामुळे भारतीय संघात बदल आवश्यक आहे.” बीसीसीआयच्या मते या नव्या निवड समितीच्या अध्यक्षपदी एका टी-२० मधील चांगली कारकीर्द राहिलेल्या खेळाडूची निवड केली जाईल. असे असल्यास व्यंकटेश प्रसाद हे या अध्यक्षपदासाठी उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहेत.