नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणांनी गुंडांपुढे शरणांगती पत्करली असल्याचे तेथील सध्याचे चित्र आहे. राज्यात कोणालाही कोठेही सुरक्षित वाटेनासे झाले आहे, अशी टीका कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी तेथील योगी सरकारवर पुन्हा एकदा केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की नागरिकांना आता घरात, ऑफिसात किंवा रस्त्यावर कोठेही सुरक्षित वाटेनासे झाले आहे.
विक्रम जोशींच्या हत्येनंतर कानपुरात अपहरण करण्यात आलेले संजीत यादव यांची खंडणीची रक्कम देऊनसुद्धा अपहरणकर्त्यांनी हत्या केली आहे.
उत्तरप्रदेशात सरळसरळ गुंडाराज सुरू आहे. कायदा आणि
सुव्यवस्था कायम राखण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे ती यंत्रणाच गुंडाना शरण गेल्यासारखी स्थिती आहे असे त्यांनी आज आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.