रायबरेलीमध्ये दारू पिऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण महाराजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहारपूरचे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
काय प्रकरण आहे
मंगळवारी पहारपूर येथील रहिवासी असलेल्या रामधानी यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. याच समारंभात दारूची पार्टी झाली. दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडू लागली. सायंकाळी उशिरापर्यंत या पार्टीमध्ये सहभागी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती चिंतानजक झाली. त्यांच्यावर सीएचसी महाराजगंजमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय इतर अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या सर्वांनी दारू प्यायली होती, त्यानंतर मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
एका कार्यक्रमादरम्यान दारू पिणाऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे ज्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. काहींनी तर बाहेरून दारू आणून पिली. विषारी दारू असण्याची शक्यता असून, त्याची चौकशी केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की आणखी काही लोक आहेत ज्यांनी दारुचे सेवन केले होते. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. खबरदारी म्हणून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. यूपीमध्ये निवडणुकीच्या काळात पोलीस अशा प्रकरणांवर कडक नजर ठेवून असताम मात्र यानंतरही अशी घटना समोर आली आहे.