मेरठ (उत्तर प्रदेश) :- उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका गावाजवळ 11 केव्ही पॉवर केंद्राच्या वायरच्या संपर्कात आलेल्या वाहनामुळे कावड यात्रेतील पाच जण दगावले असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना मेरठ जिल्ह्यातील भवानपूरच्या रली चौहान गावात घडली. तेथे कावड यात्रेकरूंचे वाहन लोंबकणाऱ्या हाय-टेंशन पॉवर लाइनच्या संपर्कात आले.
या घटनेनंतर परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून यात्रेकरूंना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. या घटनेत विजेचा धक्का बसलेल्या अन्य पाचपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिकांचा एक गट परिसरात जमा झाला आणि त्यांनी या घटनेस जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने केली.
यापूर्वी, वसंत विहारमधील उड्डाणपुलावर टॅक्सीने धडक दिल्याने 38 वर्षीय कावड यात्रेकरू जखमी झाला होता, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.