लखनौ – समाजवादी पक्षाने लखनौ रेंजच्या आयजींची बदली करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयजी पदावर असलेल्या लक्ष्मीसिंह यांचे पती भाजपच्या तिकिटावर सध्या निवडणूक लढवत असून त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी त्या मतदारांना धमकावत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
सपाचे उमेदवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, लक्ष्मी भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी लोकांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे येथील निवडणूक प्रक्रियेत त्यांच्याकडून गैरवाजवी हस्तक्षेप सुरू आहे. त्यांचे पती, राजेश्वर सिंह हे ईडीचे माजी अधिकारी आहेत.
ते लखनौच्या सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही म्हणून थेट निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करावी लागली, असे ते म्हणाले.