लाहौर – पाकिस्तानात आलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीमुळे तेथे अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे नियोजन मंत्री एहसान इक्बाल यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. पूरामुळे देशभरात झालेले नुकसान भरून येण्यासाठी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो.
देशात निर्माण होणाऱ्या अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी भारताकडून अन्नधान्य आयात करण्याचाही विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्कत राष्ट्राच्या माध्यमातून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला 160 दशलक्ष डॉलरच्या मदतीचे आवाहन केले आहे. (Unprecedented food shortage in Pakistan)