गांधीनगर – गुजरातमधील गांधीनगर येथे मोठी दुर्घटना घडली. येथील घाण पाण्याची टाकी साफ कऱण्यासाठी टाकीत उतरलेल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. हे घाण पाणी एका केमिकल कंपनीतील असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाच कामगारांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. गांधीनगर जिल्ह्यातील कलोल येथील खटराज गावातील ही घटना आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. घटनेची माहिती फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी देण्यात आली आहे.
दरम्यान मृत कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गुदमरून या कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.