नवी दिल्ली – एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या संयुक्त उपक्रमाने त्याच्या महत्वाकांक्षी उजाला कार्यक्रमांतर्गत एलईडी दिवे वितरण आणि विक्रीची सात वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. आजपर्यंत, देशभरात 36.78 कोटींहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा शून्य अनुदानित देशांतर्गत प्रकाश कार्यक्रम म्हणून विकसित झाला आहे जो उच्च अकार्यक्षम प्रकाशामुळे होणारा विद्युतीकरण खर्च आणि उच्च उत्सर्जन यासारख्या समस्यांचे निराकरण करतो.
वर्ष 2014 मध्ये, उजाला ने एलईडी बल्बची किरकोळ किंमत प्रति बल्ब 300-350 रुपयांवरून प्रति बल्ब 70-80 रुपयांवर आणण्यात यश मिळवले. सर्वांसाठी परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्यासोबतच, कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचतही झाली. आजपर्यंत कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनात 3.86 कोटी टन कपातीसह 9,565 मेगावॅट सर्वाधिक मागणी टाळण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत, सरकारने पारदर्शकता सुनिश्चित केली आहे आणि वस्तू आणि सेवांच्या ई-खरेदीद्वारे स्पर्धेला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे व्यवहाराच्या किमतीत आणि वेळेत लक्षणीय घट झाली असून प्रक्रिया कार्यक्षमता वाढली आहे. उजालामुळे एलईडी बल्बची किंमत 85 टक्क्यांनी कमी झाली आहे.