मुंबई – राज्य सरकारकडून एखादी समिती नेमली जाते, तेव्हा त्या समितीच्या मताचा आदर केला पाहिजे. पुरस्कार देण्यापूर्वी ही चर्चा होण्याची गरज होती. पुस्तक न वाचता पुरस्कार कसं देता. तसेच, न वाचता माघारी कसा घेऊ शकता. ते पुस्तक पहिले वाचले गेले पाहिजे. मग पुस्तकात काय आहे, हे बघायची जबाबदारी कोणाची आहे?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) उपस्थित केला आहे.
कोबाड गांधी यांच्या “फॅक्चर्ड फ्रीडम’ या मराठी अनुवादित पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. यंदा राज्य वाड्मय पुरस्कारांच्या निवड प्रकियेच्या छाननी समितीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक, आर्या आपटे, अरविंद दौडे यांनी या पुस्तकाची शिफारस केली. मात्र, पुरस्कार जाहीर झाल्यावर समिती सदस्य प्रा. नरेंद्र पाठक यांनीच “फॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यास आक्षेप घेतला. त्यानंतर सरकारने हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे.