Udayanraje Bhosle : २०१९ मध्ये साताऱ्याच्या राजकारणात मोठे बदल घडून आले होते. खासदार उदयनराजेंनी (Udayanraje) राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा (Udayanraje) दारुण पराभव केला होता. यासर्व घडामोडीमुले याठिकाणचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. दरम्यान, सध्या उदयनराजेंच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
साताऱ्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना उदयनराजे(Udayanraje) यांनी,“माझी निवडणुकीची हौस भागली,” असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी पुढे बोलताना “माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजले नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं कळालं सुद्धा नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात,” अशी टोलेबाजी उदयनराजेंनी(Udayanraje) केली.
त्यासोबतच शरद पवारांविषयी बोलताना उदयनराजे(Udayanraje) यांनी ,“शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं,” असे म्हटले.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पालिकेनं हद्दवाढ भागात आकारलेल्या घरपट्टीवरून लूट केल्याचा आरोप सातारा विकास आघाडीवर केला होता. यालाही उदयनराजेंनी(Udayanraje) सडेतोड उत्तर दिले आहे. “सुविधा हव्यात पण घरपट्टी नको, मग सुविधा कशा मिळणार, सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बिनबुडाच्या आरोपांना भीक घालत नाही,” असे म्हणत उदयनराजेंनी(Udayanraje) शिवेंद्रराजेंवर टीका केली होती.