वाल्हे -करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुरंदर तालुक्यातील वाल्हे गाव तसेच परिसरामधील वाड्या-वस्ती सोमवार, मंगळवार दोन दिवस पूर्ण बंद राहणार आहे. यापूर्वीही वाल्हे गाव, वाड्या – वस्ती 12 ते 14 एप्रिल असे तीन दिवस. तसेच 18 व 19 एप्रिल असे दोन दिवस पूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते.
या दोन दिवसामध्येही ग्रामस्थांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.