भाटघर -भाटघर धरणाच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या राजघर (ता. भोर) येथे विजेच्या तारेच्या धक्क्याने दोन गायींचा मृत्यू झाला. राजघर येथे गणेश पडवळ यांच्या शेतात दोन गायी चरत असताना विजेच्या तारेचा धक्का लागून ही दुर्दैवी घटना नुकतीच घडली.
यामुळे पडवळ यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे, अशी माहिती माऊली नलावडे यांनी दिली.