मुंबई: कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार संजय राऊत, नवाब मलिक यांनी मोदींवर चौफेर टीका केली.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिले. राम कदम म्हणाले, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांनी दिवे लावण्याविषयी नंतर बोला आधी सॅनिटायझर आहे सांगून तुमचे कार्यकर्ते पाणी मारून जनतेला का फसवतात? महाराष्ट्राच्या जनतेला दमडी सुद्धा पॅकेज न देणार्या सरकारने जनतेची उपासमार थांबवा . मोदी सरकारने दिलेला मोफत धान्य जनतेला कधी मिळणार आधी स्पष्ट करा, असे खडसावले आहे.