चिंबळी -पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळी ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्याकडेला आठ दिवसांपूर्वी रात्री अज्ञात वाहनाने घनकचरा टाकला असून तो अद्यापही तसाच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
परिसरात डासांचे साम्राज्य वाढल्याने नाक मुठीत धरून जा-ये करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरीही प्रशासन ढीम्म असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर या दुर्गंधी युक्त कचऱ्यामुळे परिसरात रोगराईचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.