शिरूर (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातून पायी निघालेले बाराशेच्या आसपास रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील मध्यप्रदेश मधील कामगारांना अखेर उद्या ट्रेन मिळाली असल्याची माहिती आमदार अँड अशोक पवार यांनी दिली. ही ट्रेन उरळी कांचन येथून निघणार आहे.
दिनांक 3 मे रोजी शिरूर शहराजवळ सातशे ते आठशे परप्रांतीय कामगार पायी प्रवास करत मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथे निघाले होते. या सर्व कामगारांना शिरूर तहसिलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी अटकाव करून शिरूर येथील मयुर लॉन्स व कानिफनाथ मंगल कार्यालय येथे राहण्याची सोय केली होती. आमदार अशोक पवार यांनी यावेळी या सर्व कामगारांची रात्री दीड वाजता फोनवर चर्चा करून तुम्हाला तुमच्या गावाला जाण्याची सर्व व्यवस्था करणार आहे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार अशोक पवार, प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी.
या परप्रांतीय कामगारांची विचारपूस करून आमदार अशोक पवार यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून तुम्हाला ट्रेन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगून त्यांना परप्रांतीय कामगारांना दिलासा दिला होता. गेल्या या दोन दिवसापासून आमदार अशोक पवार हे या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क करून या कामगारांसाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. अखेर आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून उद्या जवळपास बाराशे कामगार पुण्याहून मध्यप्रदेश येथे जाणार असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.
या परप्रांतीय कामगारांना सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठी मदत केली आहे तर या कामगारांना सोडवण्यासाठी तर सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याचे सांगितले.