येरवडा – धानोरी पोरवाल रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावणे, तसेच मोठया प्रमाणावर अतिक्रमन यावर कारवाई कोण करणार? सिग्नलचे खांब उभे केले मात्र ते सुरु असून काही उपयोग होत नाही.
वाहतूक पोलीसही येथे नसतात. शनिवारी संध्याकाळी या वाहतूक कोंडीत एक ऍम्ब्युलन्स अडकली होती. येथील डीपी रस्त्याचे काम लवकर करण्यात येईल, असे लोकप्रतिनिधींनी दिलेलं आश्वासन केव्हा पूर्ण करणार ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारीत आहे.