पुणे -दडी मारून बसलेल्या पावसाने ताम्हिणी घाटासह राज्यातील अन्य घाट आणि डोंगरमाथ्यावर जोरदार हजेरी लावली. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात सर्वाधिक 146, तर ताम्हिणी घाटात 130 मिमी पावसाची नोंद झाली. खंडित पावसामुळे यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाले आहे. आता सप्टेंबरचे दहा दिवस संपत आले, तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात घाटमाथ्यावर पुढील आठ दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे. पुणे शहरात त्या तुलनेत पावसाचा जोर अजूनही कमीच आहे. घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला असून, जोरदार तर काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
घाटमाथ्यावरील पाऊस (मिमीमध्ये)
लोणावळा- 110, शिरगाव -112, शिरोटा-54, ठाकुरवाडी-50, वळवण -85, वाणगाव-59, अंबवणे -129, भिवपुरी -70, धावडी-114, डुंगरवाडी-91, कोयना-146, खोपोली-90, खंद-84, ताम्हिणी -130, भिरा-82, धारावी-44.