पोर्ट एलिझाबेथ :– आयसीसीच्या महिला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (शनिवार, 6.30 वा.) भारतीय महिला संघाचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होत आहे. या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवलेल्या भारतीय संघाने हा सामना जिंकला तर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे.
या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवले. त्यांचा सलामीचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता व त्यात संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतरचा दुसरा सामना वेस्ट इंडिजशी खेळला गेला व त्यात संघाने 6 गडी राखून विजय प्राप्त केला.
दुसरीकडे इंग्लंडनेही सरस कामगिरी केली आहे. सलामीच्या लढतीत त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. त्यानंतर आयर्लंडलाही पराभूत केले होते. त्यामुळे या दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. इंग्लंडची बलाढ्य फलंदाजी रोखण्याचे आव्हान भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्याचे कठीण काम भारतीय फलंदाजांना करायचे आहे.
#INDvAUS 2nd Test Day 1 : टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया 263 धावांत गारद
स्मृतीचे अपयश चिंताजनक
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना या सामन्यात कशी फलंदाजी करते यावर भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतेत वाढ होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध ती खेळली नव्हती तर वेस्ट इंडिजविरुद्ध तिला केवळ 10 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर तिच्याकडून मोठी खेळी होणे गरजेचे आहे.